क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला उत्तराखंडमधमध्ये भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतला डेहराडूनमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या मुंबईतील रुग्णालयात पंत उपचार घेत आहे. का असं म्हणाले कपिल देव? ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. ज्या पद्धतीनं आई-वडील मुलांना चूक झाल्यावर कानाखाली लगावतात.. त्याच अधिकारानं पंत ठीक झाल्यानंतर कपिल देव यांनी त्याला कानाखाली मारायचं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "ऋषभ पंतवर माझं खूप प्रेम आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा. त्याची भेट घेऊन कानाखाली मारत स्वत:ची काळजी घ्यायला त्याला सांगायचं आहे. त्याला हेही सांगायचेही की तुझ्या अपघातामुळे संघ अडचणीत सापडला आहे. मी त्याच्यावर प्रेमही करतो अन् नाराजही आहे. सध्याचे तरुण अशा चुका का करतात? त्यामुळे मला त्याला कानाखाली लावायची आहे." ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अन् टीम इंडियात पुनरागमन करावं. त्याला माझा नेहमीच आशीर्वाद अन् प्रेम असेल. पण चुकणाऱ्या मुलाला समजावण्याची आई वडिलांची जबाबदारी आहे, त्यामुळेच त्याला कानाखाली मारुन स्वत:ची काळजी घे, असं सांगायचं आहे, असे कपिल देव म्हणाले. Source:- ABPmaza #cricket #indianteam